
विद्याभ्यास आणि स्वातंत्र्यलढ्यातील कारावास गणेशपंत ऊर्फ अण्णासाहेब गोरे हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे या गावचे राहणारे. मुंबईला मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांना शिक्षणखात्यात नोकरी लागली आणि ते पुण्याला आले. त्यांना दोन मुले. थोरली गंगू आणि तिच्या पाठचा नारायण. नारायणला घरात नानू म्हणत. नानूचा जन्म १५ जून १९०७ रोजी झाला.
नागनाथ अण्णांचे कार्य खूप मोठे आहे। क्रांतीसिंह नाना पाटलांचे अण्णा खूप जवळचे मित्र। साखर कारखानदारीतले ते तर आदर्शच आहेत। डाव्या चळवळीत राहून त्यांनी कायम जन सहवास मान्य केला। खरे तर अशी माणसे सत्तेच्या केंद्रस्थानी असायला हवीत। दुर्दैवाने ते होत नाही। भ्रष्ट आणि सवंग लोक सत्तेत आले की भयंकर अधःपतन व्हायला सुरुवात होते। आपण आज दुर्दैवाने त्याच काळाचे साक्षीदार आणि वाहकही आहोत।
How to buy these book