
शासन निर्णय रावापु-1012/प्र.क्र.104/2012/भाषा-3, दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने सन 2012-13 पासून प्रदान करण्यात येत आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रु. 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. :
1) | प्रा. के.ज. पुरोहित | 2011 |
2) | ना.धों. महानोर | 2012 |
3) | श्री. वसंत आबाजी डहाके | 2013 |
4) | श्री. द. मा. मिरासदार | 2014 |
5) | प्रा. रा.ग. जाधव | 2015 |
6) | श्री. मारूती चित्तमपल्ली | 2016 |
7) | श्री. मधु मंगेश कर्णिक | 2017 |